खरतर रोहिणी खेवलकरांची राजकीय एन्ट्री व्हावी ही अनेक खडसे समर्थकांची ईच्छा होतीच पण ती एन्ट्री खडसेंचा राजकीय बळी देऊण होईल हे अनपेक्षितच..????
खडसेंना उमेदवारी न देता त्यांच्या मुलीला उमेदवारी देऊन भाजपा सरकारची कुटनिती लोकांनी लक्षात घेणे गरजेचे आहे कारण..
1) खडसे हे पुन्हा निवडुन आल्यास त्यांना मंत्रीपद द्यावेच लागेल..
2) मंत्रीपद दील्यास त्यांना मागिल काळात त्रास देणार्या आणि पक्षाअंतर्गत विष पेरणार्या लोकांचा ते वचपा काठण्याची शक्यता नाकारता येत नाही..
3) खडसे तळागाळातुन मोठे झालेले असल्याने त्यांच वक्तृत्व आणि अनुभवाच्या जोरावर ते पुन्हा मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत येऊ शकतात..
4) खडसेंच्या मुलीला उमेदवारी देऊन त्या निवडुन आल्या तरी त्या नवख्या आहेत असे कारण देऊन त्यांना मंत्रीपद देणे टाळता येऊ शकते..
5) खडसेंना विधानभवनात नो एन्ट्री करुन त्यांच मानसिक आणि राजकीय खच्चीकरण करुन त्यांना राजकारणातुन बाद करण्यासाठी हा सोईस्कर उपाय विदयामान मुख्यमंत्र्यांच्या मनात असु शकतो.
खडसेंसारखा राज्यभर उमेदवारी बहाल करणार्या पावरफुल नेत्याने स्वताच्या उमेदवारी साठी रांगेत लागुन आपलीच कींमत कमी करुन घेणे त्यांच्या समर्थकांच्या पचनी पडणे अवघडच आहे.
शिवाय खडसेंच्या जान्याने पक्षला कुठलिही हानी होऊ नये म्हणुन अतिशय मायक्रो प्लॅनिंग करुन खडसेंना खड्या सारख बाजुला काढुन ठेवल ते अस की खडसेंच्या समर्थक सर्व आमदारांची करो या मरो अशि परीस्थिती भाजपा ने केली ती अशी..
1) आमदार हरीभाऊं जावळेंना उमेदवारी बहाल केली आता त्यांनी खडसेंच्या समर्थनार्थ राष्ट्रवादी कींवा काँग्रेस पक्षात जायचा विचार केल्यास त्या जागेवर काँग्रेस चे शिरीष चौधरी हे प्रबळ दावेदार आहेत म्हणजे हरीभाऊ नाथाभाऊ सोबत जाणार नाहीच..
2) आमदार संजय सावकारे यांना उमेदवारी बहाल केली आता त्यांनी खडसेंच्या च्या समर्थनार्थ राष्ट्रवादी कींवा काँग्रेस पक्षात जायचा विचार केल्यास त्या जागेचे राष्ट्रवादीचे सतिश घुले हे प्रबळ दावेदार आहेत थोडक्यात सावकारे नाथाभाऊ सोबत जाणार नाहीच..
3) आमदार राजुमामा भोळे यांना उमेदवारी बहाल केली आता त्यांनी खडसेंच्या च्या समर्थनार्थ राष्ट्रवादी कींवा काँग्रेस पक्षात जायचा विचार केल्यास त्या जागेवर मामांच्या जागी भाजपाचेच ललित कोल्हे हे प्रबळ दावेदार आहेत थोडक्यात राजुमामा सुद्धा नाथाभाऊ सोबत जाणार नाहीच..
अशा प्रकारे खडसेंची राजकीय कोंडी करुन त्यांना संपवण्यासाठी भाजपा ने कीती मायक्रो प्लॅनिंग केली हे लक्षात येताना हल्लीच्या राजकारणाची पातळी कुठे जात आहे असं बघुन खरोखर वाईट वाटते.
(म्हणुण खडसेंना मुख्यमंत्री पदापासुन दुर ठेवुन दुखावलेला बहुजन समाज खडसेंच्या पाठीशी आज सुद्धा उभा आहे पण खडसेंनी पक्षासोबत ही तळजोड केल्यास बहुजन समाजात त्यांच्या बद्दल सुद्धा नाराजीचा सुर ऊमटु शकतो म्हणुण त्यांनी जिल्ह्यातील सर्व तालुक्यातुन राष्ट्रवादी आणि काँग्रेस हद्दपार करुन भाजपाला मोठं केलं या पक्षहीताच्या कामाच त्यांना असं फळ मिळत असेल तर त्यांनी राष्ट्रवादी – काँग्रेस पक्षात जाऊन पुन्हा त्यांनी काही विषीष्ट गाव वगळता जवळपास संपवलेल्या पक्षाला नवसंजीवनी देऊन आपण केलेल्या चुकीच प्रायश्चित्त करुन भाजपाला धडा शिकवावा अशि लोकभावना जिल्ह्याच्या राजकारणात गाजतेय..)
थोडक्यात खडसेंनी सत्तेसाठी लाचार न होता ,स्वाभिमान दाखवून त्यांची ताकद दाखवुन भाजपाला जो वाढवु शकतो तो जमिनीत गाडुही शकतो हे दाखवुन देण्याची हीच योग्य वेळ आहे.
व्हाट्सअप साभार – मी एक सर्वसामान्य सुज्ञ खांदेशवासी..