Thursday, July 10, 2025
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

भाजपकडून मुख्यमंत्रीपदाचे लेखी आश्वासन हवेः शिवसेना

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
26/10/2019
in राजकारण, विशेष
Reading Time: 1 min read
भाजपकडून मुख्यमंत्रीपदाचे लेखी आश्वासन हवेः शिवसेना

मुंबई-शिवसेनेच्या आमदारांची ‘मातोश्री’वरील बैठक संपली असून मुख्यमंत्रीपदासाठी शिवसेनेनं आक्रमक भूमिका घेतलीय. अडीच-अडीच वर्ष मुख्यमंत्रीपद आणि सत्तेत समान वाटा द्यावा, अशी मागणी शिवसेनेच्या आमदारांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंकडे केलीय. यामुळे ऐन दिवाळीत महाराष्ट्रातलं राजकीय वातावरण तापलं आहे. भाजपकडून लेखी पत्र घेतल्याशिवाय पुढचा निर्णय घेऊ नये, अशीही मागणी शिवसेनेतून करण्यात आलीय. भाजप ठरल्याप्रमाणे वागली नाही तर इतर पर्याय खुले असल्याचं उद्धव ठाकरे आमदारांना संबोधित करताना म्हणाले. तर दिवाळीनंतर भाजप-शिवसेनेच्या नेत्यांमध्ये बैठक होईल. यात फॉर्म्युला निश्चित केला जाईल, असं भाजपचे नेते आणि केंद्रीय मंत्री रावसाहेब दाने यांनी स्पष्ट केलंय. 
लोकसभा निवडणुकीवेळी भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांच्यासोबत बैठक झाली होती. यावेळी महाराष्ट्रात सत्तेत समान वाटा दिला जाईल, असं आश्वासन शहा यांनी दिलं होतं. यामुळे मुख्यमंत्रीपद अडीच-अडीच वर्ष असावं अशी मागणी शिवसेनेनं केलीय. तसंच भाजपकडून यासंदर्भात लेखी पत्र घेतल्याशिवाय पुढचं पाऊल टाकू नये, अशी आक्रमक भूमिका शिवसेनेच्या आमदारांनी बैठकीत घेतलीय. तर सत्ता स्थापनेचे सर्वाधिकार आमदारांनी उद्धव ठाकरे यांना दिलेत, अशी माहिती आमदार प्रताप सरनाईक यांनी बैठकीनंतर दिली. जवळपास एक तास शिवसेनेच्या नवनिर्वाचीत आमदारांची बैठक चाचली. मुख्यमंत्रीपदात समान वाटा मिळेपर्यंत पुढील चर्चा नको, अशी भूमिका आता शिवसेनेनं घेतलीय. 

टिम-सत्यमेव जयते

Share this:

  • Twitter
  • Facebook
  • Telegram
  • WhatsApp

Like this:

Like Loading...

Previous Post

परिवर्तन तर्फे आज “दिवाळी पहाट”

Next Post

जळगांव तालुक्यात पिकांचे अतिवृष्टीमुळे मोठे नुकसान अद्याप पंचनामे नाही- शेतकरी चिंतेत

Next Post

जळगांव तालुक्यात पिकांचे अतिवृष्टीमुळे मोठे नुकसान अद्याप पंचनामे नाही- शेतकरी चिंतेत

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FACEBOOK PAGE

FOLLOW

ताज्या बातम्या

कासंमपुरा येथे विद्यालयाच्या वतीने पायी दिंडीचे उत्साहात आयोजन

कासंमपुरा येथे विद्यालयाच्या वतीने पायी दिंडीचे उत्साहात आयोजन

सरस्वती विद्या मंदिर प्राथमिक व माध्यमिक विद्यालय प्रकटले चिमुकले विठ्ठल

सरस्वती विद्या मंदिर प्राथमिक व माध्यमिक विद्यालय प्रकटले चिमुकले विठ्ठल

सरस्वती प्राथमिक व माध्यमिक विद्यालयात योग दिन संपन्न

सरस्वती प्राथमिक व माध्यमिक विद्यालयात योग दिन संपन्न

क्वांटम संगणन उपक्रमाच्या माध्यमातून प्राध्यापकांना प्रशिक्षण;उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांची माहिती

क्वांटम संगणन उपक्रमाच्या माध्यमातून प्राध्यापकांना प्रशिक्षण;उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांची माहिती

भारतीय स्टेट बँक ऑफ इंडिया चोपडा शाखेच्या वतीने तसेच चोपडा सामान्य रुग्णालय चोपडा यांच्या संयुक्त विद्यमाने रक्तदान शिबिर

भारतीय स्टेट बँक ऑफ इंडिया चोपडा शाखेच्या वतीने तसेच चोपडा सामान्य रुग्णालय चोपडा यांच्या संयुक्त विद्यमाने रक्तदान शिबिर

महारष्ट्रातील घडामोडी तुमच्या मोबाईलवर

चित्रफीत दालन

Video Player
https://youtu.be/TzzuE2yX3DI
00:00
00:00
03:54
Use Up/Down Arrow keys to increase or decrease volume.

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

बातम्या

Select Category

    Powered By Tech Drift Solutions.

    No Result
    View All Result
    • Home
    • रोजगार
    • लैंगिक शिक्षण
    • माहितीचा अधिकार २००५
    • शैक्षणिक
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • राजकारण
    • लेख
    • संपादकीय

    Powered By Tech Drift Solutions.

    whatsapp-logo
    %d

      Notifications