Tuesday, June 23, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

भाजपकडून मुख्यमंत्रीपदाचे लेखी आश्वासन हवेः शिवसेना

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
26/10/2019
in राजकारण, विशेष
Reading Time: 1 min read
भाजपकडून मुख्यमंत्रीपदाचे लेखी आश्वासन हवेः शिवसेना

मुंबई-शिवसेनेच्या आमदारांची ‘मातोश्री’वरील बैठक संपली असून मुख्यमंत्रीपदासाठी शिवसेनेनं आक्रमक भूमिका घेतलीय. अडीच-अडीच वर्ष मुख्यमंत्रीपद आणि सत्तेत समान वाटा द्यावा, अशी मागणी शिवसेनेच्या आमदारांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंकडे केलीय. यामुळे ऐन दिवाळीत महाराष्ट्रातलं राजकीय वातावरण तापलं आहे. भाजपकडून लेखी पत्र घेतल्याशिवाय पुढचा निर्णय घेऊ नये, अशीही मागणी शिवसेनेतून करण्यात आलीय. भाजप ठरल्याप्रमाणे वागली नाही तर इतर पर्याय खुले असल्याचं उद्धव ठाकरे आमदारांना संबोधित करताना म्हणाले. तर दिवाळीनंतर भाजप-शिवसेनेच्या नेत्यांमध्ये बैठक होईल. यात फॉर्म्युला निश्चित केला जाईल, असं भाजपचे नेते आणि केंद्रीय मंत्री रावसाहेब दाने यांनी स्पष्ट केलंय. 
लोकसभा निवडणुकीवेळी भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांच्यासोबत बैठक झाली होती. यावेळी महाराष्ट्रात सत्तेत समान वाटा दिला जाईल, असं आश्वासन शहा यांनी दिलं होतं. यामुळे मुख्यमंत्रीपद अडीच-अडीच वर्ष असावं अशी मागणी शिवसेनेनं केलीय. तसंच भाजपकडून यासंदर्भात लेखी पत्र घेतल्याशिवाय पुढचं पाऊल टाकू नये, अशी आक्रमक भूमिका शिवसेनेच्या आमदारांनी बैठकीत घेतलीय. तर सत्ता स्थापनेचे सर्वाधिकार आमदारांनी उद्धव ठाकरे यांना दिलेत, अशी माहिती आमदार प्रताप सरनाईक यांनी बैठकीनंतर दिली. जवळपास एक तास शिवसेनेच्या नवनिर्वाचीत आमदारांची बैठक चाचली. मुख्यमंत्रीपदात समान वाटा मिळेपर्यंत पुढील चर्चा नको, अशी भूमिका आता शिवसेनेनं घेतलीय. 

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

परिवर्तन तर्फे आज “दिवाळी पहाट”

Next Post

जळगांव तालुक्यात पिकांचे अतिवृष्टीमुळे मोठे नुकसान अद्याप पंचनामे नाही- शेतकरी चिंतेत

Next Post

जळगांव तालुक्यात पिकांचे अतिवृष्टीमुळे मोठे नुकसान अद्याप पंचनामे नाही- शेतकरी चिंतेत

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

लिपीक वर्गीय कर्मचाऱ्यांसाठी लेखा विषयक प्रशिक्षणाचे आयोजन

लिपीक वर्गीय कर्मचाऱ्यांसाठी लेखा विषयक प्रशिक्षणाचे आयोजन

विविध योजनांच्या लाभार्थ्यांना हयातीचा दाखला जमा करण्याचे आवाहन

विविध योजनांच्या लाभार्थ्यांना हयातीचा दाखला जमा करण्याचे आवाहन

नाशिक रोड मध्यवर्ती कारागृहात ‘आंतरराष्ट्रीय योग दिन’ उत्साहात संपन्न; कैदी आणि अधिकारी वर्गाचा उत्स्फूर्त प्रतिसाद

नाशिक रोड मध्यवर्ती कारागृहात ‘आंतरराष्ट्रीय योग दिन’ उत्साहात संपन्न; कैदी आणि अधिकारी वर्गाचा उत्स्फूर्त प्रतिसाद

फाली शेतीचे ‘पॉवर हाऊस’ शेतकरी-उद्योजक प्रतिनिधीचा सुर; फाली-१२ वार्षिक अधिवेशनच्या अंतिम टप्प्याची सुरूवात

फाली शेतीचे ‘पॉवर हाऊस’ शेतकरी-उद्योजक प्रतिनिधीचा सुर; फाली-१२ वार्षिक अधिवेशनच्या अंतिम टप्प्याची सुरूवात

जैन हिल्स ला प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजनेचा विशेष कार्यक्रम;प्रोत्साहन अनुदान थेट लाभार्थ्यांना होईल हस्तांरण;पंतप्रधान नरेंद्र मोदींची असेल ऑनलाईन उपस्थिती

जैन हिल्स ला प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजनेचा विशेष कार्यक्रम;प्रोत्साहन अनुदान थेट लाभार्थ्यांना होईल हस्तांरण;पंतप्रधान नरेंद्र मोदींची असेल ऑनलाईन उपस्थिती

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo