Sunday, July 13, 2025
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

बोंडअळीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शेतकऱ्यांनी फरदड घेणे टाळावे-कृषि विभागाचे आवाहन

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
26/12/2019
in विशेष
Reading Time: 1 min read

जळगाव-(जिमाका) – शेंदरी/गुलाबी बोंड अळींचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी/ रोखण्यासाठी तसेच पुढील वर्षी किडीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शेतकऱ्यांनी कापूस पीकाची फरदड घेऊ नये. असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी संभाजी ठाकूर यांनी केले आहे. त्याचबरोबर कापूस पीक शेतातून माहे डिसेंबर अखेर पुर्णत: काढून टाकावे. त्यानंतर 5 ते 6 महिने शेत पुर्णपणे कापूस विरहित ठेवल्यास शेंदरी बोंडअळीचे जीवनचक्र संपुष्ठात येवून पुढील हंगामात बोंड अळीचा प्रादुर्भाव कमी होतो. शेंदरी बोंड अळी डिसेंबर महिन्यानंतर खाद्य उपलब्ध नसल्यास सुप्त अवस्थेत जाते. परंतु फरदडीमुळे जीवनक्रम चालू राहून पुढील हंगामात लागवड करण्यात येणाऱ्या कापसावरही तिचा पुन्हा प्रादुर्भाव होतो. कापसाच्या पिकाचा हंगाम संपल्यानंतर शेतामध्ये शेळ्या, मेंढ्या तसेच इतर जनावरे चरण्यासाठी सोडावीत. तसेच कपाशीच्या पऱ्हाट्यांमध्ये किडीच्या सुप्त अवस्था राहत असल्याने गंजी करून शेतबांधावर ठेवू नये, पीक काढणीनंतर पऱ्हाट्या, व्यवस्थित न उघडलेली किडग्रस्त बोंडे व पाला पाचोळा नष्ट करून शेत स्वच्छ ठेवावे. पीक काढणीनंतर जमिनीची खोल नांगरट करावी, त्यामुळे जमिनीवर आलेले किडींचे कोष तसेच इतर अवस्था नष्ट होतील. जिनींग-प्रेस मिल तसेच कापुस साठवण केलेल्या जागी प्रकार सापळे, कामगंध सापळे (फेरोमन ट्रॅप्स) लावावेत. जेणेकरून तेथे अस्तीत्वात असलेल्या शेंदरी /गुलाबी बोंडअळींना नष्ट करता येईल . तरी जिल्ह्यातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांनी कापूस शेतातील कापूस पऱ्हाट्या व त्याचा पालापाचोळा पुर्णपणे नष्ट करून कापसाची फरदड घेवू नये. असेही श्री. ठाकूर यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.

टिम-सत्यमेव जयते

Share this:

  • Twitter
  • Facebook
  • Telegram
  • WhatsApp

Like this:

Like Loading...
Previous Post

तारादुत प्रकल्पांतर्गत पाचोरा येथील विद्यार्थ्यांनी सुर्यग्रहणाचे केले दर्शन

Next Post

जळगावकरांना मिळाल्या 20 रूपयांच्या कोर्‍या नोटा

Next Post

जळगावकरांना मिळाल्या 20 रूपयांच्या कोर्‍या नोटा

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FACEBOOK PAGE

FOLLOW

ताज्या बातम्या

लोहारा येथे पावसाळ्यातही तीव्र पाणी टंचाई… आजही होतोय टँकरने गावाला पाणीपुरवठा

लोहारा येथे पावसाळ्यातही तीव्र पाणी टंचाई… आजही होतोय टँकरने गावाला पाणीपुरवठा

गुरु पौर्णिमे निमित्त विविध कार्यक्रमातून डॉ केतकी ताई पाटील यांनी केली गुरूवंदना

गुरु पौर्णिमे निमित्त विविध कार्यक्रमातून डॉ केतकी ताई पाटील यांनी केली गुरूवंदना

प.वि.पाटील व ए.टी. झांबरे विद्यालयाची परिवहन समिती सभा संपन्न

प.वि.पाटील व ए.टी. झांबरे विद्यालयाची परिवहन समिती सभा संपन्न

Private:

जामनेर वनक्षेत्रपालांकडून माहिती “निरंक” चा सुर…. नंतर अपूर्ण माहिती देवून सारवासारव करण्याचा प्रयत्न…

“घंटा नांद आंदोलन” प्रकरणात सर्व आरोपी निर्दोष; न्यायालयाकडून मुक्तता

“घंटा नांद आंदोलन” प्रकरणात सर्व आरोपी निर्दोष; न्यायालयाकडून मुक्तता

महारष्ट्रातील घडामोडी तुमच्या मोबाईलवर

चित्रफीत दालन

Video Player
https://youtu.be/TzzuE2yX3DI
00:00
00:00
03:54
Use Up/Down Arrow keys to increase or decrease volume.

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

बातम्या

Select Category

    Powered By Tech Drift Solutions.

    No Result
    View All Result
    • Home
    • रोजगार
    • लैंगिक शिक्षण
    • माहितीचा अधिकार २००५
    • शैक्षणिक
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • राजकारण
    • लेख
    • संपादकीय

    Powered By Tech Drift Solutions.

    सत्यमेव जयतेचे अपडेट्स व्हाटसअ‍ॅपवर मिळवा.

    %d

      Notifications