दिनांक ११ ते १७ जानेवारी दरम्यान राबविले जाणार अभियान
जळगांव(प्रतिनीधी)- राज्यात नैसर्गिक मृत्यूनंतर सर्वाधिक मृत्यू हे रस्ते अपघातात होत असतात आणि या अपघातामधे दर वर्षी जवळपास शेकडो प्रवाशांचा मृत्यू होत असतो. त्यामुळे रस्त्यावरील प्रवाशांच्या सुरक्षिततेचा प्रश्न सध्या ऐरणीवर आला आहे. ही बाब लक्षात घेऊन राज्यभरात वाहतुक रस्ता जनजागृती सप्ताहास सुरुवात करण्यात आली आहे. याच अनुषंगाने महामार्ग पोलिस पाळधी यांच्या वतीने ३१ वा रस्ता सुरक्षा अभियान हा दिनांक ११/०१/२०२० ते १७/०१/२०२० पावेतो राबविण्यात येत आहे. यावेळी अभियानात महामार्ग पोलिस केंद्र पाळधी चे स.पो.नि. सुनील मेढे यांनी अजिंठा चौफुली, ईच्छा देवी चौक, आकाश वाणी चौक, या भागात वाहन चालक व नागरिकांना रस्ता सुरक्षा बाबत माहिती पत्रक वाटण्यात आले व सुरक्षेबाबत जनजागृती करण्यात आली. सदर ठिकाणी स.फौ.ममराज जाधव, पो.हे.काँ पंकज बडगुजर, पो.शि.हितेश पाटील, गिरीश शिंदे, घनश्याम पवार, हेमंत महाडीक, प्रदीप रणीत आदी पोलीस कर्मचारी उपस्थित होते.