जळगाव-(प्रतिनिधी)-आम आदमी पार्टीने तिसऱ्यांदा अरविंद केजरीवाल यांच्या नेतृत्वाखाली दिल्ली विधानसभा निवडणुकीत बहुमत सिद्ध केल्याने जळगाव जिल्ह्यासह जळगाव शहरात आनंदोत्सव साजरा करण्यात आला. अरविंद केजरीवाल यांचे बहुमत सिद्ध झाल्याने पक्षात इतर राज्यात नव चैतन्याचे वातावरण निर्माण झाले आहे. जळगाव शहरातील पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी रस्त्यावर उतरून आम आदमी स केंद्रबिंदू मानून रस्त्यावर ये-जा करणाऱ्या रस्त्यावरील आम आदमी स पेढे वाटप करण्यात आले. पक्षाच्या विजयाचा आनंद संपूर्ण जिल्हाभर जल्लोष करून साजरा करण्यात आला. जिल्ह्यातील तालुक्यातील पदाधिकाऱ्यांनी जळगाव जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन करून सदिच्छा पर फोन करून अभिनंदन करत होते. व एकमेकांचे शुभेच्छा देऊन प्रत्यक्ष भेटीत स्वागत करत होते. जळगाव शहरातील पदाधिकारी आनंदाने भारावले होते.
तसेच अरविंद केजरीवाल यांचा विजय झाल्याबद्दल व पक्षाला बहुमत सिद्ध झाल्याबद्दल आणि अरविंद केजरीवाल मुख्यमंत्रीपदी विराजमान होणार असल्याबद्दल अरविंद केजरीवाल यांना ई-मेल द्वारे सदिच्छा व शुभेच्छा देण्यात आल्या. आम आदमी पक्षाच्या विकास पूर्ण वाटचालीस पुढील पाच वर्षाकरिता सदिच्छा देण्यात आल्या.
आम आदमी पक्षाचे नेतृत्व सिद्ध करणे कामी दिल्लीकरांनी विकासाच्या मुद्द्यावर मतदान केलेल्या मतदारांचे कौतुक करून आभार व्यक्त करण्यात आले व दिल्लीकरांचा आदर्श इतर राज्यांनी घेऊन धर्मनिरपेक्षता राखावी. व संपूर्ण भारत एकसंघ रहावा म्हणून पदाधिकाऱ्यांनी इन्कलाब जिंदाबाद, भारत माता की जय. वंदे मातरम् या घोषणा देण्यात आल्या.
पक्षाच्या विजयाचा आनंद साजरा करणेकामी डॉक्टर सुनील जी गाजरे, जिल्हाध्यक्ष रईस खान, महानगराध्यक्ष योगेश शिवरकर, महेश मंडोरे, योगेश भोई, अनिल वाघ व इतर कार्यकर्ते उपस्थित होते.