Wednesday, July 9, 2025
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

“एम.पी.एस.सी ग्रस्थ”

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
04/08/2019
in लेख, विशेष
Reading Time: 1 min read
“एम.पी.एस.सी ग्रस्थ”

(हर्षल सोनार – जळगाव) – एम.पी.एस.सी ने किती विद्यार्थ्याना अधिकारी बनवल ते माहीत नाही पण MPSC न विविध क्लासेस चालकांना,अभ्यासिका मालकांना,झेराॅक्सवाले,विविध पुस्तक प्रकाशने,वसतीगृह चालक,मेसवाले एवढच काय तर चहाच्या ठेला लावणार्यांना देखील अति श्रीमंत केल एवढ मात्र नक्की..

आज महाराष्ट्रातील गावखेड्यापासुन ते शहरा पर्यत बहुतांश पदवीधर मुलांना MPSC या भयानक आजाराची लागण झालीय.महाराष्ट्र भरातील हजारो अभ्यासिकेत लाखो सुशिक्षित युवक मोठमोठ्या ठोकड्या मध्ये रात्रदिवस तोंड खुपसुन बसलेले दिसतील.२४ तासापैकी १२ ते १६ तास अभ्यास करणारे विद्यार्थी मी स्वतः पाहीलेत.
एक परिक्षा पास झाली म्हणजे चांगली आरामदायी,सुरक्षित नोकरी,पैसा,पद,प्रतिष्ठा,पाॅवर मिळेल या आशेने महाराष्ट्रातील प्रत्येक पदवीधर युवक एकदा का होईना पण या MPSC आजाराला बळी पडतोच. काही समजदार यातुन वेळ राहता यातुन बाहेर पडतात,तर काही आपले अख्या आयुष्याची वाट स्वतःहुन लावुन घेतात.

आपल्याकडे सोशल मिडिया वर ट्रेंड चालतात तसेच काही ट्रेंड काही वर्षांपासून शिक्षणात देखील चालू आहे. ९० च्या दशकात डीएड , बीएड चा ट्रेंड आला होता तो ट्रेंड २००४ आणि २००५ पर्यंत कायम होता मग तेव्हापासून आजपर्यंत इंजिनिअरिंग आणि मेडिकल चा ट्रेंड चालू आहे. पण काही ट्रेंड हे विशिष्ठ काळानंतर संपतात आणि काही कमी होतात. या सगळ्या मध्ये एक ट्रेंड मोठाच होत गेला त्या ट्रेंड स्वरूप इतक्या मोठ्या प्रमाणात वाढलं की तो ट्रेंड थांबावने आता अवघड होतय. त्या ट्रेंड च आता कंर्मर्शिलाझेशन मोठ्या प्रमाणात झालाय, त्यात अनेक लोक करोडपती , हिरो झाले आहेत तर अनेक लोक रोडपती, झिरो झाले आहेत.

     या ट्रेंड च नाव आहे स्पर्धा परिक्षा सध्या आपल्याकडे बेरोजगारीचा खूप मोठा प्रश्न आहे. अशातच अनेक विद्यार्थी हे लाखोंच्या संख्येने डिग्री घेऊन प्रत्येक वर्षी बाहेर पडतायेत. यामध्ये अनेक मुलांचं कॉलेज मधून प्लेसमेंट होत तर काहींना ओळखीने कुठे तरी जॉब भेटतो पण बाकीच्यांचं काय?

मग आता पुढे करायच काय ? घरचे आणि नातेवाईक विचारणार काय चाललंय सध्या?
त्यावेळी सगळ्यांना एक चांगलं उत्तर बाहेर येते आणि ते म्हणजे स्पर्धा परीक्षा. डिग्री झाल्यानंतर अनेक जण ठरवतात की १ ते २ वर्ष आपल्याला स्पर्धा परीक्षेला द्यायचे पण कधी त्याचे ७ ते ८ वर्ष निघून जातात हे त्यालाही कळत नाही पण तोपर्यंत वेळ निघून गेलेली असते. वय वाढलेलं असत, इंटरव्हिव ला गेल्यानंतर पहिला प्रश्न विचारल्या जातो डिग्री होऊन एवढे वर्ष झाले पण त्या प्रश्नाला उत्तर नसत आणि मग यातूनच निराशा वाढायला सुरुवात होते, मग तणाव वाढायाला लागतो. घरच्यांना सुद्धा कंटाळून म्हणाव लागत तू तुझ बघ आता.
या सगळ्याची सुरूवात होते ती मोबाईल पासून. विद्यार्थी गावाकडे असताना मोबाईल वर जिद्द, चिकाटी , मेहनत ,आत्मविश्वास ,संघर्ष , दृढता ,निश्चय असे मोठे मोठे दोन,तीन लोकांचे भाषण(स्पर्धा परीक्षेतील विद्यार्थ्यांचे आयडॉल असलेल्या ) बघतो. आणि ते कसे १० ते १२ वेळेस अपयशी झाले हे डोकयात घेऊन तो त्याचा मोर्चा पुण्याकडे वळवतो. पुण्याकडे का? कारण हे दोन, तीन पण पुण्यातच असतात.
घरची परिस्थिती नसताना सुद्धा आपल्या मुलाला पुण्यात शिकायला पाठवतात. कारण प्रत्येक मायबापाचं स्वप्न असते की आपला मुलगा यशस्वी होऊन सेटल झाला पाहिजे. हीच त्यांची प्रामाणिक इच्छा असते. आई-वडील म्हणता वेळ पडली तर जमीन विकू पण मुलाला अधिकारी करू.
मग पोरग गावाकडून पुण्यात येतो. मग त्याची हॉस्टेल किंवा रूम ची शोधाशोध सुरु होते त्यातच काही मित्रही दोन ते तीन वर्षपासून पुण्यात राहत असतात. मग पुण्यातील पेठेत कुठल्यातरी वाड्यात त्याची राहायची व्यवस्था होते.
पुण्यात जे काही चार, पाच नावाजलेले आणि करोडो रुपये कमावलेले क्लासेस आहेत ते देखील पेठेतच आहे. हा मुलगा मग एक ते दोन लाख रुपये फी भरून क्लास लावतो. पहिल्याच दिवशी सगळ्या क्लास मध्ये सारख्याच लोकांनां त्यांच्याच क्लास चे म्हणून सत्कार समारंभ आयोजित केला जातो. मुळात हा सत्कार समारंभ एखाद्या ग्रँड इव्हेंट पेक्षा कमी नसतो. हा विद्यार्थी शहरात पहिल्यांदाच गावाकडून आलेला असतो त्यामुळे हैराण ,परेशान होत असल्यामुळे साहजिकच अनेक मित्र-मैत्रिणी भेटतात मग ग्रुप तयार होतो. मग हळूहळू चहा चे प्लॅन बनायला सुरुवात होते.मग ते भावी अधिकारी त्या चहा पिण्यात यांचे दिवसातले चार ते पाच तास कसे जायाला लागतात हे त्यांना देखील कळत नाही.

एम.पी.एस.सी ने किती विद्यार्थ्याना अधिकारी बनवल ते माहीत नाही पण MPSC न विविध क्लासेस चालकांना,अभ्यासिका मालकांना,झेराॅक्सवाले,विविध पुस्तक प्रकाशने,वसतीगृह चालक,मेसवाले एवढच काय तर चहाच्या ठेला लावणार्यांना देखील अति श्रीमंत केल एवढ मात्र नक्की..

       तिकडं तोपर्यंत बापानं एक एकर शेत विकलेल असत. असं नाही की पोरग अभ्यास नाही करत, बाहेर शिकणाऱ्या प्रत्येक पोराला वाटत असत की आपण काही तरी केलं पाहिजे, त्यामुळे ते पोरग पण मन लावून अभ्यास करत असत पण मग वर्षानुवर्षे MPSC च्या जागाच निघत नाही आणि जागा निघाल्या तरी १००० च्या वर कधी निघत नाही आणि त्या जागांसाठी लाखोंच्या संख्येने फॉर्म येतात बंर हे सर्व लाखो जण सगळं सारखंच अनुसरण करत असतात त्यामुळे हे १००० सोडले तर बाकीच्यांना पुढच्या वर्षी पर्यंत थांबण्यापेक्षा पर्याय नसतो. पुन्हा तेच चक्र दरवर्षी परत परत. 
          १००० विद्यार्थी स्पर्धा परीक्षा उत्तीर्ण होऊन नौकरीला लागतात पण बाकीच्यांचं काय? त्यांच्या पोट पाण्याचं काय? त्यांच्या घरच्यांचं काय? त्यांचा जो वेळ वाया गेला त्याच काय ? असे अनेक प्रश्न मात्र अनुत्तरित राहतात . त्यामुळे आता कुठे तरी अस म्हणण्याची वेळ आली आहे युट्युब वर एखाद स्पर्धा परीक्षेसाठी डीमोटिवेटिंग भाषण वायरल झाल पाहिजे. 
     ज्यामुळे या M.P.S.C ग्रस्त रूग्नाना या आजारातुन त्वरित बाहेर पडुन काही तरी व्यवसाय,धंदा करता येईल.नोकरी मागणार्या पेक्षा नोकरी देणारे  होता येईल.
टिम-सत्यमेव जयते

Share this:

  • Twitter
  • Facebook
  • Telegram
  • WhatsApp

Like this:

Like Loading...

Previous Post

वरणगाव येथील चौधरी कुटूंब नऊ महिन्या पासून न्यायाच्या प्रतीक्षेत

Next Post

आ.सतीश पाटीलांचे तहसील कार्यालयासमोर बेमुदत उपोषण सुरु

Next Post
आ.सतीश पाटीलांचे  तहसील कार्यालयासमोर बेमुदत उपोषण सुरु

आ.सतीश पाटीलांचे तहसील कार्यालयासमोर बेमुदत उपोषण सुरु

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FACEBOOK PAGE

FOLLOW

ताज्या बातम्या

कासंमपुरा येथे विद्यालयाच्या वतीने पायी दिंडीचे उत्साहात आयोजन

कासंमपुरा येथे विद्यालयाच्या वतीने पायी दिंडीचे उत्साहात आयोजन

सरस्वती विद्या मंदिर प्राथमिक व माध्यमिक विद्यालय प्रकटले चिमुकले विठ्ठल

सरस्वती विद्या मंदिर प्राथमिक व माध्यमिक विद्यालय प्रकटले चिमुकले विठ्ठल

सरस्वती प्राथमिक व माध्यमिक विद्यालयात योग दिन संपन्न

सरस्वती प्राथमिक व माध्यमिक विद्यालयात योग दिन संपन्न

क्वांटम संगणन उपक्रमाच्या माध्यमातून प्राध्यापकांना प्रशिक्षण;उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांची माहिती

क्वांटम संगणन उपक्रमाच्या माध्यमातून प्राध्यापकांना प्रशिक्षण;उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांची माहिती

भारतीय स्टेट बँक ऑफ इंडिया चोपडा शाखेच्या वतीने तसेच चोपडा सामान्य रुग्णालय चोपडा यांच्या संयुक्त विद्यमाने रक्तदान शिबिर

भारतीय स्टेट बँक ऑफ इंडिया चोपडा शाखेच्या वतीने तसेच चोपडा सामान्य रुग्णालय चोपडा यांच्या संयुक्त विद्यमाने रक्तदान शिबिर

महारष्ट्रातील घडामोडी तुमच्या मोबाईलवर

चित्रफीत दालन

Video Player
https://youtu.be/TzzuE2yX3DI
00:00
00:00
03:54
Use Up/Down Arrow keys to increase or decrease volume.

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

बातम्या

Select Category

    Powered By Tech Drift Solutions.

    No Result
    View All Result
    • Home
    • रोजगार
    • लैंगिक शिक्षण
    • माहितीचा अधिकार २००५
    • शैक्षणिक
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • राजकारण
    • लेख
    • संपादकीय

    Powered By Tech Drift Solutions.

    whatsapp-logo
    %d

      Notifications