Sunday, June 14, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

केळी पिकाकरिता “मनरेगा” योजना लागू; खा. उन्मेशदादा पाटील यांची माहिती

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
10/08/2022
in राज्य
Reading Time: 1 min read

10 ऑगस्ट 2022 रोजी नियोजन विभाग (रोहयो प्रभाग) चा शासन निर्णय झाला निर्गमित :केळी पिक उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा

केळी फळपिकास मिळणार रु.2,56,395/- प्रति हेक्टर अनुदान.

जळगाव — जिल्ह्यात केळी हे महत्त्वाचे नगदी फळ पिक असून या पिकाखालील क्षेत्र अंदाजे 60,000 हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्र आहे. यापूर्वी वेळोवेळी पत्रव्यवहार करुन केळी पिकाचा समावेश महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेत व्हावा. याबाबत मागणी केली होती. त्या अनुषगाने शासन निर्णय निर्गमित करून केळी या पिकाचा समावेश महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत झाल्याचे आदेश निर्गमित करण्यात आले होते. परंतु केळी पिकाकरिता “मनरेगा” योजनेची अंमलबजावणी करण्यात आली नसल्याने शेतकरी मोठ्या प्रमाणात त्रस्त झाले होते.
याबाबत दि.1 एप्रिल 2022 व 26 जुन 2022 रोजी तात्काळ केळी विकास मनरेगा योजनेची अंमलबजावणी होणे बाबत कार्यवाही करावी अशी आग्रही मागणी खासदार उन्मेश दादा पाटील यांनी राज्य शासनाकडे केली होती.


त्या अनुषंगाने महाराष्ट्र शासनाच्या नियोजन विभाग (रोहयो प्रभाग) ने १० ऑगस्ट २०२२ रोजी शासन निर्णय निर्गमित करून यामध्ये केळी लागवडीकरिता देखील सविस्तर अंदाजपत्रक दिलेले असून ही योजना तात्काळ लागू करण्याबाबत सूचना दिल्याने आज खऱ्या अर्थाने
केळी पिकाकरिता “मनरेगा” योजना लागू झाली असल्याची माहिती खासदार उन्मेशदादा पाटील यांनी प्रसारमाध्यमांना दिली आहे.

केळी पिक उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा


सदरील शासन निर्णयाचे अवलोकन केळी पिक उत्पादक शेतकऱ्यांनी करावे असे आवाहन करावे. यात केळी पिकास प्रति हेक्‍टरी 3704 रोप/खोड लागवड करून त्या करिता आवश्यक असणाऱ्या बाबी म्हणजेच जमीन तयार करणे,खड्डे खोदणे, काटेरी झाडाचे कुंपण करणे, माती व खताच्या मिश्रणाने खड्डे भरणे, रोपे लागवड करणे, खत देणे आंतरमशागत / घड व्यवस्थापन, पिक संरक्षण, पाणी देणे व इतर संकीर्ण या करिता मजुरी व सामग्री मिळून तीन वर्षा करिता रक्कम रु 2,56,395/- एवढे अनुदान निश्चित करण्यात आली असून या मधून 648 श्रमिक दिन एवढा रोजगार निर्माण होणार आहे. अशी माहिती देखील खासदार उन्मेश दादा पाटील यांनी दिली आहे.


जळगाव जिल्ह्यात केळी पिकाची लागवड दोन हंगामात होत असते (ज्याला स्थानिक भाषेत मृग बाग व कांदे बाग) असे संबोधले जाते. केळी मृग बागाची लागवड साधारणत: जुन व जुलै महिन्यात करण्यात येते तसेच कांदे बागाची लागवड ऑगस्ट ते ऑक्टोबर दरम्यान करण्यातयेते.सदरील शासन निर्णय निर्गमित झाल्यामुळे चालू वर्षी कांदे बागाची लागवड करणारे शेतकऱ्यांना या योजनेचा तात्काळ फायदा होईल असे मत खासदार उन्मेशदादा पाटील यांनी व्यक्त केले आहे.

केळी उत्पादक शेतकऱ्यांमध्ये चैतन्य….
मनरेगा योजनेअंतर्गत केळी पिकाचा समावेश होऊन देखील सदरील योजना लागू न झाल्याने शेतकऱ्यांनी वेळोवेळी नाराजी व्यक्त केली होती. परंतु खासदार उमेशदादा पाटील यांनी केलेल्या अभ्यासपूर्ण पाठपुराव्याने व राज्यात सरकार बदलल्याने तात्काळ झालेल्या कार्यवाहीने शेतकरी आनंदी झाले असून यामुळे शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च कमी होण्यास कुठेतरी मदत होणार आहे अशा भावना शेतकरी व्यक्त करत आहेत.
केळी पिक उत्पादक शेतकऱ्यांनी मानले
खासदार उन्मेश दादा यांचे सोशल मीडियावर आभार.


केळी पिकाकरिता “मनरेगा” योजना लागू झाल्याची माहिती खासदार उन्मेशदादा पाटील यांनी प्रसारमाध्यमांना दिली. आज *10 ऑगस्ट 2022 रोजी नियोजन विभाग (रोहयो प्रभाग) चा शासन निर्णय निर्गमित झाल्याने केळी पिक उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला असून केळी पिक उत्पादक शेतकऱ्यांनी खासदार उन्मेश दादा यांचे सोशल मीडियावर आभार मानले आहेत.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

संदेश आढाळे यांच्या मारेकऱ्यांना तातळीने अटक करा – मुकुंद सपकाळे यांची मागणी

Next Post

RBI ने या बॅंकेचे लायसन्स केले रद्द;तुमचे खाते या बॅंकेत तर नाही ना?

Next Post

RBI ने या बॅंकेचे लायसन्स केले रद्द;तुमचे खाते या बॅंकेत तर नाही ना?

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

एल-निनोच्या पार्श्वभूमीवर पाणीसाठा जपून वापरण्याचे राज्य शासनाचे निर्देश

एल-निनोच्या पार्श्वभूमीवर पाणीसाठा जपून वापरण्याचे राज्य शासनाचे निर्देश

विकसित महाराष्ट्र -२०४७ साठी शिक्षण, आरोग्य, कौशल्य विकास, महिला सक्षमीकरणासह सर्वसमावेशक मानवी विकासासाठी राज्याचे विशेष  प्रयत्न- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

विकसित महाराष्ट्र -२०४७ साठी शिक्षण, आरोग्य, कौशल्य विकास, महिला सक्षमीकरणासह सर्वसमावेशक मानवी विकासासाठी राज्याचे विशेष  प्रयत्न- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला पाचोरा तालुकास्तरीय सर्व विभागांचा कामकाज आढावा;प्रलंबित प्रश्न तात्काळ सोडविण्याचे निर्देश

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला पाचोरा तालुकास्तरीय सर्व विभागांचा कामकाज आढावा;प्रलंबित प्रश्न तात्काळ सोडविण्याचे निर्देश

जनसमाधान बैठकीतील अर्जदारांच्या विविध विषयांच्या समस्या तात्काळ सोडवा – जिल्हाधिकारी रोहन घुगे

जनसमाधान बैठकीतील अर्जदारांच्या विविध विषयांच्या समस्या तात्काळ सोडवा – जिल्हाधिकारी रोहन घुगे

जिल्ह्यात १०वी व १२ वीच्या पुरवणी परीक्षा १६ जूनपासून जिल्हाधिकारी यांनी घेतला पुर्व तयारीचा आढावा

जिल्ह्यात १०वी व १२ वीच्या पुरवणी परीक्षा १६ जूनपासून जिल्हाधिकारी यांनी घेतला पुर्व तयारीचा आढावा

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

सत्यमेव जयतेचे अपडेट्स व्हाटसअ‍ॅपवर मिळवा.