Sunday, March 15, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

कोरोना तपासणी लॅब जिल्ह्यात सुरु करा-पालकमंत्र्यांनी केली मुख्यमंत्र्यांकडे मागणी

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
07/04/2020
in विशेष
Reading Time: 1 min read
राज्याचे पाणी पुरवठा व स्वच्छता तथा जिल्ह्याचे पालकमंत्री                                   ना.गुलाबराव पाटील जिल्हा दौऱ्यावर

जळगाव, (जिमाका वृत्तसेवा) दि. 7 – जिल्ह्यात आतापर्यंत दोन कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले असून त्यापैकी एकाचा मृत्यु झाला आहे. तसेच कोरोनाचा फैलाव दिवसेंदिवस वाढत असून या पार्श्वभूमीवर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात कोरोना विषाणू संसर्ग तपासणी लॅब सुरु करावी. अशी मागणी आज राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छतामंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी आज झालेल्या मंत्रीमंडळ बैठकीत मुख्यमंत्र्यांकडे केल्याचे त्यांनी सांगितले.
राज्य मंत्रीमंडळाची बैठक आज व्हिसीव्दारे घेण्यात आली. त्यावेळी पालकमंत्री श्री. पाटील हे जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहातून या बैठकीत सहभागी झाले होते. या बैठकीमध्ये प्रत्येक जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांकडून मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांनी जिल्ह्यातील परिस्थितीचा आढावा घेतला. यावेळी आपण ही मागणी केली असून यासाठी लवकरात लवकर प्रस्ताव पाठवावा जेणेकरुन त्यास मान्यता देण्यात येईल. याकरीता आमदार स्थानिक विकास निधीतून पन्नास लाख रुपयेही देता येतील असे त्यांना बैठकीत सांगण्यात आले.
या परिस्थितीमध्ये केशरी कार्डधारकांना धान्य देण्यासाठी शासन सकारात्मक पाऊल उचलेल. पोलीसांवरील ताण कमी करण्यासाठी त्यांच्या मदतीला होमगार्डची नियुक्ती करावी. अशी मागणीही पालकमंत्र्यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. गरीब व गरजूंना भोजन मिळावे. याकरीता तालुका तेथे शिवभोजन केंद्र सुरु करण्यात येत आहे. या सर्व बाबींचा या बैठकीत आढावा घेण्यात आला असल्याचेही त्यांनी सांगितले.
जळगाव जिल्हयात एक कोरोना पॉझीटिव्ह व्यक्ती मृत्यू पावली असून एक व्यक्ती आयसोलेटेड वार्डात ॲडमिट आहे. मध्यप्रदेश व गुजरात राज्याची सीमा जिल्ह्याला लागून असल्याने या सीमा बंद करण्यात याव्यात. यामुळे तेथील कोणीही इकडे येवू शकणार नाही, जेणेकरुन आपला जळगाव जिल्हा कोरोनामुक्त होईल. केळी पीकाचे भाव लक्षात घेता याबाबतीत आपण जैन एरिगेशन सिस्टीमला विनंती करणार आहोत की, त्यांनी शेतक-यांची केळी घ्यावी. जेणेकरुन शेतक-यांना दिलासा मिळेल. राज्यात कोरोना रुग्णांची संख्या अचानक वाढल्याने पीपीई किटचा प्रश्न उदभवला आहे. तो दोन ते चार दिवसात सुटणार आहे. अंगणवाडी सेविका, आशा वर्कर, पोलिस पाटील, स्वच्छता कर्मचारी, आरोग्य कर्मचारी यांना सुध्दा मास्क पोहोचविण्याचा निर्णय झाला.
कोरोनाच संकट हे आपल संकट आहे असे मानावे. आपल्याला या संकटावर मात करायची आहे. यासाठी मी जनतेला आणि विविध संस्थाना विनंती करतो की, त्यांनी मुख्यमंत्री सहाय्यता निधीमध्ये जेवढी जास्तीत जास्त मदत करता येईल तेवढी करावी. असेही त्यांनी म्हटले.

टिम-सत्यमेव जयते

Share this:

  • Click to share on X (Opens in new window) X
  • Click to share on Facebook (Opens in new window) Facebook
  • Click to share on Telegram (Opens in new window) Telegram
  • Click to share on WhatsApp (Opens in new window) WhatsApp

Like this:

Like Loading...
Previous Post

कर्तव्यात कसूर केलेल्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील 25 कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस – जिल्हाधिकारी डॉ अविनाश ढाकणे

Next Post

शेतातील गव्हाच्या गंज्या पेटवणाऱ्या दृष्ट प्रवृत्तीचा हा भामटा कोण, विरोदे येथील दुसरी घटना

Next Post
शेतातील गव्हाच्या गंज्या पेटवणाऱ्या दृष्ट प्रवृत्तीचा हा भामटा कोण, विरोदे येथील दुसरी घटना

शेतातील गव्हाच्या गंज्या पेटवणाऱ्या दृष्ट प्रवृत्तीचा हा भामटा कोण, विरोदे येथील दुसरी घटना

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FACEBOOK PAGE

FACEBOOK PAGE

FOLLOW

ताज्या बातम्या

अपघाती निधन झालेल्या महसूल सहाय्यकाच्या कुटुंबाला ₹2.64 लाखांची मदत; विद्यार्थिनींना शालेय साहित्य वाटप

अपघाती निधन झालेल्या महसूल सहाय्यकाच्या कुटुंबाला ₹2.64 लाखांची मदत; विद्यार्थिनींना शालेय साहित्य वाटप

वडिलांच्या स्मृतीप्रीत्यर्थ गावदरवाजा कमानवर मुलाने केले हनुमान मूर्तीची स्थापना..

वडिलांच्या स्मृतीप्रीत्यर्थ गावदरवाजा कमानवर मुलाने केले हनुमान मूर्तीची स्थापना..

सामाजिक कायद्यामुळेच समाज नियंत्रीत आहे, – मा. न्यायमुर्ती सुनील शुक्रे

सामाजिक कायद्यामुळेच समाज नियंत्रीत आहे, – मा. न्यायमुर्ती सुनील शुक्रे

समाजकार्य महाविद्यालयात दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

समाजकार्य महाविद्यालयात दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनीच्या समाजकार्य महाविद्यालयात ‘आत्मनिर्भर युवती अभियान’ उत्साहात संपन्न

धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनीच्या समाजकार्य महाविद्यालयात ‘आत्मनिर्भर युवती अभियान’ उत्साहात संपन्न

महारष्ट्रातील घडामोडी तुमच्या मोबाईलवर

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

बातम्या

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo
%d