Wednesday, June 24, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

गणेशोत्सव आनंदोत्सव” सप्ताह अंतर्गत कृती फाऊंडेशन तर्फे “ग्राम स्वच्छता अभियान” संपन्न

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
01/09/2020
in राज्य
Reading Time: 1 min read
गणेशोत्सव आनंदोत्सव” सप्ताह अंतर्गत कृती फाऊंडेशन तर्फे “ग्राम स्वच्छता अभियान” संपन्न


जळगांव(प्रतिनिधी)- स्वच्छता हे कोणाच्या दबावाखाली येऊन करण्यासारखे काम नाही आहे. आपल्या निरोगी आणि स्वस्थ जीवनासाठी ही एक चांगली सवय आहे. चांगल्या आरोग्यासाठी सगळ्या प्रकारची स्वच्छता आवश्यक आहे मग ती व्यक्तिगत असो की, आपल्या आजूबाजूच्या परिसरातील, याचाच एक भाग म्हणून कृती फाऊंडेशनच्या वतीने रावेर तालुक्यातील दुर्गम भागातील कळमोदा या गावात ग्राम स्वच्छता मोहीम राबविण्यात आली.


याबाबत सविस्तर असे की, लॉकडाऊनचे नियम शिथिल केल्यामुळे काही जनता व्यवसायासाठी बाहेर पडू शकत आहे. सर्वसामान्य लोकांनी आपले दैनंदिन व्यवसाय चालू केले आहेत. दैनंदिन व्यवहार चालू असताना काही लोकांना कोरोनाची लागण होते. जगात कोरोना विषाणू महामारीने थैमान घातले असून त्याचा संसर्ग आता अगदी कानाकोपऱ्यात पोहचला आहे. यामुळे हा कोरोना आजार आपल्या गावापर्यंत येऊ नये यासाठी कळमोदा गावातील रहिवाश्यांनी कृती फाऊंडेशनच्या पदाधिकाऱ्यांना गाव निर्जंतुकीकरणासाठी मागणी केली. त्यांनी केलेल्या मागणीची फाउंडेशनने तात्काळ दखल घेत कळमोदा गावात “ग्राम स्वच्छता मोहीम” राबविण्यात आली. यात सर्वप्रथम संपूर्ण गावातील कचरा जमा करुन गावाच्या बाहेर नेऊन जाळण्यात आला. तदनंतर संपूर्ण गावात निर्जंतुकीकरणासाठी हायपोक्लोराईडची फवारणी करण्यात आली. सदर उपक्रमाची संकल्पना कृती फाउंडेशन सचिव जी.टी.महाजन, पोलीस बिनतारी संदेश विभाग नाशिक शहरचे सफौ अफजल तडवी यांची असून पोलीस बिनतारी संदेश विभागाचे अमित माळी, सलीम तडवी, जिल्हा विशेष शाखेचे दीप्ती अनफट, चेतन निंबोळकर यांच्यावतीने राबविण्यात आली. यावेळी स्वच्छतेचे धडे देण्यात आले. पूर्ण गावात साफसफाई ठेवावी व सर्व नागरिकांनी दिवसातून दर दोन तासानंतर हात साबणाने किंवा सँनिटायजरने स्वच्छ धुवावे व कोरोना व्हायरसला गावात येऊ न देता आरोग्याची काळजी घ्यावी. असा संदेश यावेळी आयोजकांच्या वतीने गावकऱ्यांना देण्यात आला. प्रसंगी, सरपंच सरला पाटील, पोलीस पाटील हर्षाली जावळे, दिलदार तडवी, शाबीर तडवी, कुरबान तडवी, फकिरा तडवी आदी उपस्थित होते.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

राष्ट्रीय राजपुत करनी सेनेच्या वतीने पोलीस, डॉक्टर, आरोग्य सेवकांना कोरोना योद्धा पुरस्कार

Next Post

जळगाव जिल्ह्यात आज ५४१ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले

Next Post
जळगाव जिल्ह्यात आज  267 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले

जळगाव जिल्ह्यात आज ५४१ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

ग्रामरोजगार सहाय्यकांच्या प्रश्नांबाबत शासन सकारात्मक

ग्रामरोजगार सहाय्यकांच्या प्रश्नांबाबत शासन सकारात्मक

चित्रपट निर्मितीत कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर जबाबदारीने व्हावा : राज्यपालांचे आवाहन

चित्रपट निर्मितीत कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर जबाबदारीने व्हावा : राज्यपालांचे आवाहन

लिपीक वर्गीय कर्मचाऱ्यांसाठी लेखा विषयक प्रशिक्षणाचे आयोजन

लिपीक वर्गीय कर्मचाऱ्यांसाठी लेखा विषयक प्रशिक्षणाचे आयोजन

विविध योजनांच्या लाभार्थ्यांना हयातीचा दाखला जमा करण्याचे आवाहन

विविध योजनांच्या लाभार्थ्यांना हयातीचा दाखला जमा करण्याचे आवाहन

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo