Sunday, March 15, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

जिल्ह्यात वनाधिकारी होताय धनाधिकारी

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
26/08/2019
in विशेष
Reading Time: 1 min read

जिल्ह्यात अवैध वृक्ष तोड वाढली आहे,याला जबाबदार वनविभाग ?

जळगांव-(चेतन निंबोळकर) – जिह्यात अवैध वृक्षतोड जोरात सुरु असुन वनविभागाने याकडे संपुर्ण दुर्लक्ष केले आहे. राञीच्या वेळेस मोठमोठ्या वृक्षांची कत्तल केली जात असुन टेम्पो लावुन लाकडांची तस्करी केली जात आहे. पर्यावरणाचा पुर्णपणे रास झाला असुन जिल्ह्यातील वनराई ठिकाणांचे रुपांतर वाळवंटात झाले आहे. ऐन दुष्काळात लाकडांची तस्करी कोणाच्या आशिर्वादाने सुरु आहे, याची चर्चा स्थानिक नागरिक करत आहे.जिल्ह्यात अवैध वृक्षतोड ही वनक्षेत्राच्या मुळावर उठली आहे. खासगी तसेच राखीव वनक्षेत्रात स्वार्थासाठी छुप्या पद्धतीने वृक्षतोड करण्यात येते. काही स्थानिक नागरिक व काही वेळा वनविभागाची पडद्यामागची छुपी भ्रष्टाचारी यामुळे ही समस्या ओढवली आहे.  जिल्ह्यात चारही बाजूंनी वनक्षेत्र असल्याने वनक्षेत्रावर मोठ्या प्रमाणात आर्थिक देवाणघेवाण करून वृक्षतोड होते. इंधन, फर्निचरसाठी मोठ्या प्रमाणावर वृक्षाची तोड करण्यात येते. जिल्ह्यातील एकूण भागातील जंगलात मोठ्या प्रमाणावर सागाचे वृक्ष आढळतात. डोंगरउतारावरील रचनेमुळे हिवाळ्याच्या उत्तरार्धात व उन्हाळ्यात वणवा लागण्याच्या घटना मोठ्या प्रमाणात होत असतात. यामध्ये वनसंपत्तीचा ऱ्हास होतो. या मुख्य कारणामुळे वणव्याचे बहुतांशी प्रमाण असलेल्या भागातील नागरिक वृक्ष वणव्याच्या तोंडी पडण्यापेक्षा त्याची तोड करणेच योग्य समजतात. अशा नागरिकांच्या आगळ्या वेगळ्या गैरसमजामुळे आज जिल्ह्यातील बरीचसी जंगले उनाड होण्याच्या मार्गावर आहेत. वनक्षेत्रात स्थानिक लोकांकडून स्वार्थासाठी अशाच घटनांना वाव देण्यात येत आहे. दुसरे कारण म्हणजे वनविभागातील भ्रष्टाचारामुळे जंगलातील वृक्षसंपत्ती आज कमी होण्याच्या मार्गावर आहे. जिल्ह्यातील वनक्षेत्रात अशा घटना मोठ्या प्रमाणात होत असून याकडे वनविभागाचा कानडोळा आहे. यात संबधित परिसरातील काही वनपालापासून बड्या अधिकाऱ्यांपर्यंत हात असण्याचा अंदाज असतो.जिल्ह्यातील साग या वृक्षाला परजिल्ह्यात मोठी मागणी होत असते, मात्र वनविभागाच्या चौक्‍यावर होणारी तपासणी, देण्यात येणारा पास अशा बाबी महत्वाच्या असतात. याचा अडथळा दुर करण्यासाठीही बऱ्याच वेळा लाकुडपती व्यावसायिकांकडून देण्यात येणार्‍या मोठ्या आमिषांना बळी पडल्याचे प्रकार होत असतात. त्यामुळे सत्य परिस्थिती लपविण्यात येते. वनाधिकारी आणि लाकुड व्यावसायिक आर्थिक देवाणघेवाण करून मोठ्या प्रमाणात बेकायदेशीर वृक्षतोड करतात. यामुळे मोठ्या प्रमाणात वनाच्छादित क्षेत्र घटण्याचा धोका पर्यावरणाला निर्माण झाला आहे.

टिम-सत्यमेव जयते

Share this:

  • Click to share on X (Opens in new window) X
  • Click to share on Facebook (Opens in new window) Facebook
  • Click to share on Telegram (Opens in new window) Telegram
  • Click to share on WhatsApp (Opens in new window) WhatsApp

Like this:

Like Loading...
Previous Post

ईच्छामरणाची घेतली गेली दखल;अधिकार्‍यांची होणार चौकशी

Next Post

आ.सतीश पाटील यांच्या निधीतून ३ लक्ष विकासकामाचे भूमिपूजन

Next Post

आ.सतीश पाटील यांच्या निधीतून ३ लक्ष विकासकामाचे भूमिपूजन

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FACEBOOK PAGE

FACEBOOK PAGE

FOLLOW

ताज्या बातम्या

अपघाती निधन झालेल्या महसूल सहाय्यकाच्या कुटुंबाला ₹2.64 लाखांची मदत; विद्यार्थिनींना शालेय साहित्य वाटप

अपघाती निधन झालेल्या महसूल सहाय्यकाच्या कुटुंबाला ₹2.64 लाखांची मदत; विद्यार्थिनींना शालेय साहित्य वाटप

वडिलांच्या स्मृतीप्रीत्यर्थ गावदरवाजा कमानवर मुलाने केले हनुमान मूर्तीची स्थापना..

वडिलांच्या स्मृतीप्रीत्यर्थ गावदरवाजा कमानवर मुलाने केले हनुमान मूर्तीची स्थापना..

सामाजिक कायद्यामुळेच समाज नियंत्रीत आहे, – मा. न्यायमुर्ती सुनील शुक्रे

सामाजिक कायद्यामुळेच समाज नियंत्रीत आहे, – मा. न्यायमुर्ती सुनील शुक्रे

समाजकार्य महाविद्यालयात दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

समाजकार्य महाविद्यालयात दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनीच्या समाजकार्य महाविद्यालयात ‘आत्मनिर्भर युवती अभियान’ उत्साहात संपन्न

धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनीच्या समाजकार्य महाविद्यालयात ‘आत्मनिर्भर युवती अभियान’ उत्साहात संपन्न

महारष्ट्रातील घडामोडी तुमच्या मोबाईलवर

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

बातम्या

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo
%d