राज्य मंत्रीमडळाच्या बैठकीतील निर्णय
मुंबई -(प्रतिनिधी)- राज्य मंत्रीमंडळाच्या बैठकीत आज शिक्षकांच्या बाबतीत मोठा निर्णय घेण्यात आला आहे. राज्यातील विनाअनुवादित शाळा आणि महाविद्यालयांना 20 टक्के अनुदान देण्यात येणार असल्याचा महत्वपुर्ण निर्णय बैठकीत घेण्यात आला आहे. तसेच ज्या शाळांना 20 टक्के अनुदान दिले आहे त्यांना आता 40 टक्के अनुदान देण्यात येणार असल्याची माहिती शिक्षणमंत्री आशिष शेलार यांनी दिली आहे.
दरम्यान, सरकारने लेखी आश्वासन दिल्याशिवाय आंदोलनस्थळ सोडणार नसल्याचे आंदोलक शिक्षकांनी भूमिका घेतली आहे. तर विधानभवनाच्या पायऱ्यावर बसून शिक्षणमंत्र्यांच्या घोषणेची आपण प्रतिक्षा करू असे शिक्षक आमदार विक्रम काळे यांनी म्हटले आहे. गेल्या 24 दिवसांपासून मुंबईच्या आझाद मैदानाव कायम विनाअनुवादित शाळा कृती समीमीच्या शिक्षकांचे आंदोलन सुरू आहे. जोपर्यंत 100 अनुदान देण्यात येणार असे लेखी आश्वासन देण्यात येत नाही तोपर्यंत आंदोलन करत राहणार असे शिक्षकांनी म्हटले होते. याच आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने आज निर्णय घेतला आहे.