जळगाव(प्रतिनिधी)- जळगाव भुसावळ व एकूणच मतदार संघातून दिल्ली कडे जाणाऱ्या प्रवाशांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. मतदार संघातील प्रवाशी नागरिकांना कमी वेळेत दिल्ली येथून ये जा करणे शक्य व्हावे. यासाठी सप्ताहातून दोन दिवस थांबणारी राजधानी एक्स्प्रेस दररोज थांबावी यासाठी खासदार उन्मेष पाटील यांच्याकडे मतदारसंघातून मागणी वाढतच होती. ही बाब खासदार उन्मेश पाटील यांनी रेल्वे मंत्री पियूष गोयल यांचेकडे मांडली होती. त्यांची मंत्री महोदयांनी लागलीच दखल घेत दोन दिवस थांबणारी राजधानी एक्सप्रेस आता दोन दिवस वाढवून मिळाल्याने चार दिवस थांबणार आहे. यामुळे प्रवाशांची होणारी गैरसोय काही प्रमाणात थांबणार आहे. रेल्वे मंत्रालयाशी सतत संपर्क करीत राजधानी एक्सप्रेसचे थांबे वाढवून मिळाल्याने आज या गाडीला दुपारी साडे चार वाजता खासदार उन्मेष दादा पाटील, खासदार रक्षा ताई खडसे यांनी आज हिरवी झेंडी दाखविली याप्रसंगी भुसावळ डी आर एम विवेक गुप्ता, आमदार चंदुलाल पटेल, नामदार उज्वलाताई पाटील, महापौर नामदार सीमाताई भोळे, जिल्हा परिषदेचे सभापती पोपट भोळे, उपमहापौर अश्विन सोनवणे, जिल्हा सरचिटणीस तथा माजी नगरसेवक दीपक सूर्यवंशी, पालकमंत्र्यांचे जिल्हा सचिव अरविंद देशमुख, सिनियर मंडल प्रबंधक स्वप्नील निला,सिनियर डी सी एम आर के शर्मा, सिनियर डी सी टी ई निशांत द्विवेदी, सिनियर डी ई एन दीपक कुमार, जळगाव स्टेशन प्रबंधक अरुण पाण्डेय,नगरसेवक नवनाथ दारकुंडे, किशोर बाविस्कर, नगरसेविका सरिता नेरकर, मिलिंद चौधरी आसोदा, तालुकाध्यक्ष संजय भोळे ,विशाल त्रिपाठी अजय जोशी, मनोज भांडारकर, पालक मंत्री नामदार गिरीश भाऊ महाजन यांचे जनसंपर्क अधिकारी अरविंद भाऊ देशमुख, पितांबर जी भावसार, होणाजी चव्हाण, महाराष्ट्र राज्यातील शिक्षक संघटनांच्या राज्य समन्वय समितीचे राज्य समन्वयक सामाजिक कार्यकर्ते किशोर पाटील कुँझरकर, राहुल तिवारी, गिरीश ब-हाटे, अर्जुन परदेशी, यांच्यासह मंडळ, शक्ती केंद्र प्रमुख, बूथ प्रमुख , आजी माजी नगरसेवक विविध मान्यवर उपस्थित होते.
यावेळी बोलतांना उन्मेष पाटील यांनी माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी, रेल्वे मंत्री पियूष गोयल, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री गिरीश महाजन यांचे मतदार संघातील नागरिकांच्या वतीने आभार मानले . छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस हजरत निजामुद्दीन राजधानी एक्सप्रेस ही आधी द्वीसप्ताह गाडीला चार दिवस प्रती सप्ताह थांबा वाढवून मिळाल्याने या गाडीचे स्वागत तसेच जळगाव स्थानकावरील एक्सेलेटर्स अर्थात सरकत्या जिन्यांचे मान्यवरांच्या हस्ते कळ दाबून उद्घाटन करण्यात आले .यावेळी सरकत्या जिन्यावरून प्रत्यक्ष खासदार व मान्यवरांनी आलिया उद्घाटन केले असता या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार होत ,अनेकांनी आनंदघेतला. व परस्परांना पेढे भरून जल्लोष केला. याप्रसंगी स्वच्छ भारत अभियान राबविण्यात आले. “एक कदम स्वच्छता की और” चे फलक घेऊन खासदार उन्मेष पाटील यांच्यासह उपस्थितांनी हातात झाडू घेत रेल्वे स्टेशन वर स्वच्छता केली. यावेळेस स्वच्छता पंधरवड्याच्या संदर्भात राज्य शासन आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त शिक्षक किशोर पाटील कुंझरकर यांनी कृतीयुक्त माहिती दिली, दोन्ही खासदारांसह उपस्थित सर्व मान्यवर वसर्वांनी रेल्वे स्थानकावरप्रत्यक्ष स्वच्छता करून देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र जी मोदी यांच्या स्वच्छता हीच सेवा अभियानाला कृतीयुक्त साथ दिली.