जळगाव (धर्मेश पालवे) :-दिनांक 29 संयुक्त राष्ट्राच्या महासभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या भाषणात म्हणाले की भारताने जगाला बुुद्ध दिला, मात्र त्यांच्या याच वक्तव्यावर शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे यांनी आक्षेप घेतला आहे. भारताने जगाला बुद्ध दिला, पण बुद्ध उपयोगाचा नाही तर विश्वाचा संसार चालवण्यासाठी संभाजी महाराजच पाहिजे, असं भिडे म्हणाले. संत तुकाराम व संत ज्ञानेश्वर यांच्या पेक्षा मनु श्रेष्ठ होता, आंबेडकरांनी घटना ही मनुस्मृती डोळ्यासमोर ठेवून लिहिली अशी बेधडक व खोटी तसेच इतिहासाला खोटं ठरवणारे भिडे यांनी वक्तव्य या आधीही आपल्या भाषणात केली आहेत, व याबाबत बर्याचवेळा भारतात मोठ्या प्रमाणात टीका त्यांना सहन करावी लागली आहे. अगदी याच प्रमाणे आता पुन्हा भिडे यांनी पंतप्रधान अमेरिकेत चुकीचे बोलले आहेत,मी त्यांना महाराष्ट्रात करेक्ट करतो, असं म्हणत त्यांनी पंतप्रधान खोटे बोलत असल्याचे सांगितले.नवरात्री उत्सवानिमित्त मनोहर भिडे दुर्गामाता दौड यात्रेत सहभागी झाले होते. तरूणांमध्ये हिंदू धर्मा च्या नावाखाली तरुण पिढी च्या डोक्यात विष पसरविण्याचे काम भिडे नेहमीच करत आले आहेत. त्यांनी 1982 मध्ये सांगलीत शिवप्रतिष्ठानची स्थापना केली तेव्हा पासून महापुरुषांचा इतिहास लपवून त्यांना बदनाम करण्याचा आणि तरुण मुलांचे माथे भडकावून जातीय तेढ निर्माण करण्याचे काम भिडे यांनी केले आहे. भीमा कोरेगाव हिंसाचाराच्या आरोपात भिडे हे आरोपी आहेत, नुकतेच भिडेवर तसे आरोप दाखल करण्याचे आदेश हायकोर्टाने पोलिसांना दिले असताना पुन्हा भिडेने विष ओकत बुद्ध काही उपयोगाचे नसल्याचे म्हनाले मात्र, भिडेंना हे माहीत नाही की संभाजी राजांनी सन १६७८ ला बुद्धभूषण ग्रंथ लिहून बुध्दांच्या विचारांची गरज संपूर्ण जगाला असल्याची जाणीव करून दिली होती, असा इतिहास असतांना भिडे मात्र अपप्रचार करुन भारतात जातीय तेढ निर्माण करण्याचे व तरुणाची माथे भडकवण्याचे महापाप करत असल्याच्या संतप्त प्रतिक्रिया सोशल मिडियाच्या माध्यमातून अनेकांनी नोंदवल्या आहेत. सोशियल मीडिया तुन जनतेच्या मोठ्या प्रमाणात प्रतिक्रिया येत असल्याचं दिसत आहे.