विद्यार्थ्यांनी अभ्यासाएवढेच खेळाला प्राधान्य द्यावे- मनोज पाटील
जळगांव(प्रतिनीधी)- मैदानी खेळाने मन, मनगट, मेंदू याचा विकास होतो. शरीर निरोगी बनते. निरोगी शरीरात निरोगी मन वास्तव्य करते, असे प्रतिपादन संस्थेचे तथा ग स सोसायटीचे अध्यक्ष मनोज पाटील यांनी केले ते शाळेत आयोजित केलेल्या तिन दिवसीय क्रिडा महोत्सवाच्या उद्घाटन प्रसंगी बोलत होते. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष मनोज पाटील हे उपस्थित होते महोत्सवचे उद्घाटन मशाल प्रज्वलन करून करण्यात आले.प्रमुख पाहुणे म्हणून नगरसेवक सचिन पाटील, नायब तहसीलदार देवेंद्र चंदांकर, राजू सुर्यवंशी, शाळेच्या मुख्याध्यापिका कल्पना वसाणे, माध्यमिकच्या मुख्याध्यापिका दिपाली देवरे उपस्थित होते. या क्रिडा महोत्सवात इयत्ता १ली ते १० वी चे विद्यार्थ्यांच्या मोठ्या संख्येने सहभाग राहणार आहे. यामध्ये विद्यार्थी विविध प्रकारची मनोरे, प्रात्यक्षिके सादर करणार आहे तर धावणे, खो-खो, कबड्डी, लिंबू चमचा, आदि खेळांचा समावेश राहणार आहे. यामध्ये जिंकलेल्या स्पर्धेकाला प्रोत्साहनपर बक्षीस देण्यात येईल. या क्रीडा महोत्सवला सर्व शिक्षक व शिक्षके्तर कर्मचारी यांचे सहकार्य लाभले.