Tuesday, June 30, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

आंधळी पंचायत समिती कागदपत्रं न तपासता वाटतेय घरकुल

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
10/11/2019
in विशेष
Reading Time: 1 min read

तालुक्यात खर्‍या लाभार्थ्यांना उघड्यावर राहण्याची वेळ

जळगांव-(विशेष प्रतिनिधी) -तालुक्यातील अनेक गावांमध्ये विविध घरकुलातील लाभार्थ्यांना कागदपत्रांची योग्य पुर्तता न करता तसेच आवश्यक तपासणी न करताच रमाई, शबीर या योजनांतील घरकुलांचे वाटप होत असल्याची माहिती समोर येत आहे. यामुळे जळगांव पंचायत समिती आंधळी झाली की काय असे वाटू लागले आहे. कारण सदर प्रकारांमुळे खरे लाभार्थ्यी लाभापासून वंचित झाले असल्याच्या तक्रारी अनेक सामाजिक कार्यकर्ते करीत आहेत.
दरम्यान, शासनाने प्रत्येक गरजू व्यक्तीला पक्के घर देण्याचे आश्वासन दिले आहे. मात्र सदर योजना राबवितांना जळगांव पंचायत समितीकडून नियमांचं उल्लंघन झाल्याचे बोललं जात आहे. सदर योजनेतील लाभार्थ्यांची खरी वस्तुस्थिती न बघता आलेले कागदपत्रं न तपासता तसेच अपुरे कागदपत्रांच्या आधारे गरज नसलेल्या लाभार्थ्यांना सदर योजनेत सामिल केले जात असून अशा बोगस लाभार्थ्यांवर कारवाई व्हावी अशी मागणी जोर धरत आहे.
जागेवर जावून पडताळणीची गरज सदर लाभार्थी हा खरच गरजू आहे का? योजनेच्या सर्व नियमांमध्ये तो बसतो का? याची शहानिशा करणे गरजेचे आहे. ग्रामपंचायतीने दिलेल्या कागदपत्रांच्या आधारावर घरकुल वाटप केले जातेय हे खरं आहे, मात्र हाच योग्य लाभार्थी आहे का? याची शहानिशा करण्यासाठी स्पोट व्हेरिफीकेशन गरजेचं मानलं गेलं आहे. या सर्व प्रकाराकडे पं.स.कडून दुर्लक्ष होतांना दिसत आहे.
अशा लाभार्थ्यांवर गुन्हा दाखल करावा खोटे कागदपत्रं देणं, शासनानाला चुकीची माहिती भरुन देणं हा गुन्हा आहे. असे प्रतिज्ञापत्र देखील लाभार्थ्यांकडून भरुन घेतलं जातं मात्र वेळ आल्यावर कोणतीही कारवाई होत नाही. म्हणून शासनाची फसवणुक करणार्‍या अशा बोगस लाभार्थ्यांवर थेट गुन्हे दाखल करण्याची मागणी काही समाजिक कार्यकर्त्यांकडून केली जात आहे.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

तालुक्यातील अनेक ग्रामपचांयतींकडे दिव्यांग निधी पडून

Next Post

शिवदे यांचा बालगृहात वाढदिवस साजरा

Next Post
शिवदे यांचा बालगृहात वाढदिवस साजरा

शिवदे यांचा बालगृहात वाढदिवस साजरा

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

आमदार राजूमामांच्या पाठपुराव्याला यश; रिंग रोड विकासकामाचे भूमिपूजन उत्साहात संपन्न

आमदार राजूमामांच्या पाठपुराव्याला यश; रिंग रोड विकासकामाचे भूमिपूजन उत्साहात संपन्न

वारकऱ्यांच्या आशीर्वादापेक्षा मोठी श्रीमंती नाही; वारी हीच माझ्या जीवनातील सर्वात मोठी पुण्याई – पालकमंत्री गुलाबराव पाटील

वारकऱ्यांच्या आशीर्वादापेक्षा मोठी श्रीमंती नाही; वारी हीच माझ्या जीवनातील सर्वात मोठी पुण्याई – पालकमंत्री गुलाबराव पाटील

ग्रामरोजगार सहाय्यकांच्या प्रश्नांबाबत शासन सकारात्मक

ग्रामरोजगार सहाय्यकांच्या प्रश्नांबाबत शासन सकारात्मक

चित्रपट निर्मितीत कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर जबाबदारीने व्हावा : राज्यपालांचे आवाहन

चित्रपट निर्मितीत कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर जबाबदारीने व्हावा : राज्यपालांचे आवाहन

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo