जळगांव(प्रतिनिधी)- जळगांव येथील आव्हाने शिवारातील श्री समर्थ प्राथमिक व माध्यमिक विद्यालयात राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांना जयंती निमित्त प्रतिमेस माल्यार्पण करून अभिवादन करण्यात आले.
यात इ.1ली ते 7 वी च्या विद्यार्थ्यांनी ऑनलाईन व्हीसीने आपल्या मनोगतातून युवा दिनाचे महत्व सांगितले. तसेच वकृत्व स्पर्धा व वेशभूषा धारण करून विद्यार्थ्यांनी कार्यक्रम द्विगुणित केला. शाळेच्या मुख्याध्यापिका हर्षाली पाटील यांनी विद्यार्थ्यांना अनमोल मार्गदर्शन केले. संस्थेचे अध्यक्ष तथा ग.स.अध्यक्ष मनोज पाटील यांनी विनम्र अभिवादन करून विद्यार्थ्यांचे कौतुक केले.
यावेळी प्राथमिक मुख्याध्यापिका हर्षाली पाटील, माध्यमिक मुख्याध्यापिका वैशाली शिंदे, संगीता देशमुख, जयश्री पाटील, चैताली पाटील, मोहिनी सुरवाडे दीपमाला बाविस्कर, दिशा पाटील, प्रज्ञा तायडे, राहुल पाटील, सद्दाम तडवी, समाधान निकम, सचिन वंजारी, पवन पाटील, विपुल पाटील, संदीप मोरे, प्रसन्न कोळी,आदी सहकारी शिक्षकवृंद उपस्थित होते.