जळगाव-(धर्मेश पालवे)-आजकाल मनुष्याचे जीवन धकाधकीचे चालले आहे, चुकीच्या व धावपळीच्या जीवन पद्धतीने जनसामन्याचे आपल्या आरोग्याकडे दुर्लक्ष होत आहे.त्याच बरोबर बीपी, हृदयरोग,शुगर,दमा, अस्थमा, व जनुकीय तसेच संसर्गजन्य आजाराच्या रुग्ण संख्येत वाढ होत असल्याचं चित्र सगळीकडे दिसत आहे. विविध आजाराच्या पासून सुटका होण्यासाठी रुग्ण मिळेल तो उपचार , मिळेल त्या दरात करण्यासाठी धावपळ करत असतात.याच कमजोरीचा व असहायतेचा गैर फायदा घेत काही औषधी कंपन्याकडून लवकरात लवकर बरे करून आराम देण्याचं सांगितले जाते, त्यातच औषधी चा व्यवसाय केल्यास यातून रोजगार ही उपलब्ध करून देतो अस सांगितल जात असते. रोजगार सह आरोग्य मिळेल या आशेने असंख्य लोक या आमिषाला बळी पडत असल्याचे दिसत आहे.
त्याच बरोबर, कुठलेही औषध डॉक्टर शिवाय घेतल्यास होणाऱ्या अघटित संकटास ही रुग्ण जवळ करत आहेत, अवाजवी औषध घटकांचा दूरगामी परिणाम जसे अवसाद पडणे, हार्मोनल बदल, जननेंद्रिये तील बिघाड होणे, व प्रजनन संस्थेवर परिणाम होणे, आदी गंभीर कायम स्वरूपी समस्या उदभवू शकतात. विविध कंपन्या आपल्या प्रॉडक्ट च्या खपा साठी दहावी बारावी व वैद्यकीय तसेच औषधीशास्र विषयक ज्ञान नसणाऱ्या अप्रशिक्षित व विनाअनुभवी व्यक्तींना याबाबत मार्केटिंग करवून घेतात. रोजगाराच्या आड खूप मोठा समूह भल्या मोठ्या रुग्णांना आपल्या जाळ्यात अडकवून फसवणूक करत आहेत.सदर फसव्या कंपन्यांना fssi, बेस्ट सेलर, किंवा मार्केटिंग एक्सपर्ट अशी मानांकने असल्याचं दाखवलं जात असत. मात्र कोणत्याही कंपन्यांना उद्योग सुरू करताच काही महिन्यातच अशी प्रमाणपत्रे दिली गेल्याची वृत्त दिल्ली, मुबई, पुणे, नाशिक व इतर महानगर मध्ये उघड झाले आहेत. तरी नागरिकांनी सतर्क राहून डॉक्टरांनी दिलेले व सुचवलेले औषधी वापरात आणाव्यात व फसव्या औषधी पासून सावध राहावे हे महत्वाचे आहे. या अश्या औषधावर सरकार नियंत्रण ठेवेल काय? बेरोजगारीच्या या महाप्रलयाला या जंजाळातुन सुटका मिळेल का? रुग्णनांच्या असाहायतेचा फायदा घेणाऱ्यांना औषध प्रशासन वचक दाखवेल का ? अश्या असंख्य प्रश्नांकडे बोट दाखवत जणू आयुर्वेद आपली व्यथा मांडत असल्याचं म्हणणं वावगं ठरू नये.