Sunday, March 15, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

माहीती अधिकार पुन्हा चर्चेत; जयराम यांच्यासमोर सरकारची ‘बोलती बंद’!

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
29/07/2019
in माहितीचा अधिकार २००५, राष्ट्रीय
Reading Time: 1 min read
आज जागतिक माहिती अधिकार दिन;जाणून घेऊया माहिती अधिकार कायदा थोडक्यात

नवी दिल्ली : यू.पी.ए. सरकारने चौदा वर्षांपूर्वी 2005 मध्ये मंजूर केलेल्या माहिती अधिकार कायद्याचा (आर.टी.आय.) मसुदा बनविण्याच्या समितीत असलेले ज्येष्ठ नेते जयराम रमेश यांनी मूळ विधेयक व त्यातील तरतुदी दाखवून, मोदी सरकार करत असलेली कायदादुरूस्ती संघराज्य रचनेसाठी घातक आहेच; पण तुम्ही जनतेपासून काही दडवू इच्छिता व केंद्रीय माहिती आयोगावर सत्तारूढ पक्षाचे नेतृत्व याद्वारे सूड उगवू इच्छित आहे, या तर्कास ती बळकटी देणारी आहे, असे सांगताच सत्तारूढ बाकांवर अक्षरशः निःशब्द शांतता पसरली.रमेश यांनी सरकारला आरसा दाखवतानाच चार खडेबोल सुनावले. मूळ विधेयकाच्या निर्मितीतच महत्वाचा सहभाग असलेले रमेश अक्षरशः विजयासारखे कडाडत होते. “तुम्ही आर.टी.आय. कायदा पूर्ण वाचलाय की नाही अशी संकाच मला येते, असे त्यांनी पंतप्रधान कार्यालयाचे राज्यमंत्री जितेंद्रसिंह यांना सुनावले.केंद्रीय माहिती आयोगाची इमारत आम्ही दिली असत्य आहे. कारण या इमारतीचे उद्घाटनच तत्कालीन पंतप्रधान मनमोहनसिंग यांनी केले होते. या आयोगाची नियुक्‍त्यांची पध्दतच बदलून त्याची अवस्था दात-नखे काढलेल्या वाघासारखी करण्याचा तुमचा हा प्रयत्न आहे, असे सांगून रमेश म्हणाले, की मूळ कायदा तयार करण्याच्या मसुदा समितीत भा.ज.पा.चे बाळ आपटे व विद्यमान राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्यासारखे जाणकार होते व त्यांनीही ज्या तरतुदींना मान्यता दिली. त्या बदलण्याचा तुमचा हेतू शुध्द नाही. हा कायदा म्हणजे सूडाचा प्रवास कसा आहे.

दिली पुढील उदाहरणे :  
1) 2013 मध्ये गुजरातचे तत्कालीन मुख्यमंत्री (मोदी) योजना आयोगात आले. तेव्हा त्यांना आयोगाककडून, गुजरातमधील शिक्षण व आरोग्याच्या परिस्थितीबाबत त्यांच्यसाठी अत्यंत अडचणीची ठरणारी माहिती विचारली गेली. त्यानंतर वर्षभरातच योजना आयोगाची ओळखच पुसली गेली.
2) केंद्रीय माहिती आयुक्तानी पंतप्रधानांच्या शैक्षणिक पात्रतेच्या मुद्यावर पी.एम.ओ.कडून माहिती मागविली.
3) चार कोटी बोगस शिधापत्रिका सापडल्याचा खुद्द मोदींचा संसदेतील दावा आर.टी.आय.मुळेच खोटा असल्याचे सिध्द झाले.
4) नोटाबंदीच्या निर्णयाची माहिती खुद्द रिझर्व बँकेला पंतप्रधानांच्या त्या नाट्यमय घोषणेआधी चार तास अगोदरही माहिती नव्हती. हे आर.टी.आय.मुळे जगासमोर आले.
5) रिझर्व बॅंकेचे माजी गव्हर्नर रघुराम राजन यांनी बॅंकांना बुडविणाऱ्या कर्जदारांची यादीच पंतप्रधानांना दिली होती हे R.T.I.मुळेच समजले.
6) विदेशातून किती काळा पैसा आणला त्याचा तपशील माहिती आयुक्तांनी पी.एम.ओ.कडे मागितला व पी.एम.ओ.ने तो देण्यास नकार दिला. अंतिम मतविभाजनात सरकारचा विजय होणार असे दिसते व विरोध केला तर परिणामही होऊ शकतात; पण तरी प्रादेशिक पक्षांनी लोकशाहीच्या रक्षणासाठी सरकारला या मुद्यावर अजिबात साथ देऊ नये, असे आवाहन करताच बीजू जनता दल, वाय.एस.आर. कॉंग्रेस व अण्णाद्रमुक सदस्यांचे चेहरे पाहण्यासारखे झाल्याचे चित्र दिसले. 
रमेश यांच्या तर्कशुध्द मांडणीला सरकारकडे उत्तरच नसल्याचे खुद्द जितेंद्रसिंह यांनीही मान्य केले. ते म्हणाले, की “आर.टी.आय. कायद्याबद्दल रमेश बोलत असताना एका क्षणी मलाही वाटले की याबाबतीत मी किती अशिक्षित आहे.

टिम-सत्यमेव जयते

Share this:

  • Click to share on X (Opens in new window) X
  • Click to share on Facebook (Opens in new window) Facebook
  • Click to share on Telegram (Opens in new window) Telegram
  • Click to share on WhatsApp (Opens in new window) WhatsApp

Like this:

Like Loading...
Previous Post

प्रगती शाळेत गीत गायन स्पर्धा उत्साहात

Next Post

अखिल महाराष्ट्र सफाई कर्मचारी संघटनेचे शाखा उद्घाटन

Next Post
अखिल महाराष्ट्र सफाई कर्मचारी संघटनेचे शाखा उद्घाटन

अखिल महाराष्ट्र सफाई कर्मचारी संघटनेचे शाखा उद्घाटन

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FACEBOOK PAGE

FACEBOOK PAGE

FOLLOW

ताज्या बातम्या

अपघाती निधन झालेल्या महसूल सहाय्यकाच्या कुटुंबाला ₹2.64 लाखांची मदत; विद्यार्थिनींना शालेय साहित्य वाटप

अपघाती निधन झालेल्या महसूल सहाय्यकाच्या कुटुंबाला ₹2.64 लाखांची मदत; विद्यार्थिनींना शालेय साहित्य वाटप

वडिलांच्या स्मृतीप्रीत्यर्थ गावदरवाजा कमानवर मुलाने केले हनुमान मूर्तीची स्थापना..

वडिलांच्या स्मृतीप्रीत्यर्थ गावदरवाजा कमानवर मुलाने केले हनुमान मूर्तीची स्थापना..

सामाजिक कायद्यामुळेच समाज नियंत्रीत आहे, – मा. न्यायमुर्ती सुनील शुक्रे

सामाजिक कायद्यामुळेच समाज नियंत्रीत आहे, – मा. न्यायमुर्ती सुनील शुक्रे

समाजकार्य महाविद्यालयात दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

समाजकार्य महाविद्यालयात दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनीच्या समाजकार्य महाविद्यालयात ‘आत्मनिर्भर युवती अभियान’ उत्साहात संपन्न

धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनीच्या समाजकार्य महाविद्यालयात ‘आत्मनिर्भर युवती अभियान’ उत्साहात संपन्न

महारष्ट्रातील घडामोडी तुमच्या मोबाईलवर

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

बातम्या

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo
%d