Tuesday, June 23, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

कोरोना महामारीच्या संसर्गामुळे सरकारच्या धोरणाप्रमाणे विद्यार्थ्यांच्या निकालामध्ये त्रुटी सुधारण्यासाठी विधी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचे कुलगुरूंना निवेदन देण्यात आले

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
25/08/2020
in शैक्षणिक
Reading Time: 1 min read
कोरोना महामारीच्या संसर्गामुळे सरकारच्या धोरणाप्रमाणे विद्यार्थ्यांच्या निकालामध्ये त्रुटी सुधारण्यासाठी विधी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचे कुलगुरूंना निवेदन देण्यात आले


जळगांव(प्रतिनिधी)- येथील विधी महाविद्यालयात शिक्षण घेणारे विद्यार्थ्यांनी कवयित्री बहिणाबाई चौधरी विद्यापीठाच्या कुलगुरूंना कोरोना महामारीच्या संसर्गामुळे सरकारच्या धोरणाप्रमाणे विद्यार्थ्यांच्या निकालामध्ये त्रुटी सुधारण्यासाठी निवेदन देण्यात आले. यात विद्यापीठाने घोषित केलेला निकाल पाहता ९०% विद्यार्थी हे अनुत्तीर्ण आहेत.

तसे पाहता यूजीसी मार्गदर्शक सूचनांचे पालन केल्यास असे होणार नाही असे वाटते. तेव्हा कुठल्या निकषावर हा निकाल घोषित केला आहे, यात संभ्रम आहे. दिलेल्या निकालात तोंडी परीक्षा झाली नसून कोणत्या तर्काच्या आधारावर ५०, २०गुणांपैकी सरासरी ३गुण, ५गुण व १०गुण दिलेले आहे. विद्यार्थ्यांना योग्यरित्या गुण देण्यात यावे. जेणेकरून पुढील सेमिस्टरात विद्यार्थ्यांचे विषयांचे ओझे कमी होईल. एकूण विद्यार्थी निकालाची पाहणी केल्यास असे आढळून येते की, विद्यापीठाने मागील सत्राचे समान गुण या सत्रात दिले आहे. पण ते सर्व गुण सर्व विषयांना समान रित्या वितरीत केल्यामुळे अनेक विद्यार्थी मागील सत्रात उत्तीर्ण असूनही या सत्रात अनुउत्तीर्ण आहेत. काही विदयार्थ्यांना या सत्रसाठी दिलेले गुण पूर्णतः अतार्किक आहेत. हा निकाल असाच राहिल्यास येणाऱ्या सत्रात विद्यार्थ्यांवर पडणारा भार हा न झेपणारा असेल. परिणामी या शैक्षणिक वर्षात प्रवेश मिळाला तरी पुढील सत्रातील भार त्यांच्या वर्षाचे नुकसान होईल. शैक्षणिक वर्ष २०१९-२० मध्ये सीईटी मार्फत नव्याने प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांचे प्रवेश विलंबनाने झाल्याने त्यांना पहिल्या सत्रात अभ्यासासाठी खूप कमी वेळ मिळतो. त्यांना या नवीन पॅटर्नची ओळख नसते. म्हणून ते विषयात अनुउत्तीर्ण होतात. त्यांच निकषावर द्वितीय सत्रात मार्क देणे, हे त्यांच्यावर अन्याय करण्यासारखे आहे. सोबत विधी शाखेतील एक कमिटी नेमून या प्रकरणावर विचार विमश करून विद्यार्थ्यांचा संभ्रम दूर करावा. अश्या आशयाचे निवेदन कबचौ उमवीचे कुलगुरू यांच्यासमवेत माहितीसाठी ना.मुख्यमंत्री, ना.शिक्षणमंत्री,ना.राज्यपाल यांना देतेवेळी ऍड अभिजीत रंधे, निलेश जाधव, रोहन महाजन, अमोल राठोड, अंकित चव्हाण, रोहित देशमुख, आदित्य भैसने आदी विधी शाखेचे विद्यार्थी उपस्थित होते.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

जळगाव जिल्ह्यात आज ६०४ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले

Next Post

भारतीय संविधानाचा अपमान केल्याबद्दल प्रवीण विठ्ठल तरडे यास तत्काळ अटक करून त्याच्या विरुद्ध देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी-आॅल इंडिया पॅनथल सेना

Next Post
भारतीय संविधानाचा अपमान केल्याबद्दल प्रवीण विठ्ठल तरडे यास तत्काळ अटक करून त्याच्या विरुद्ध देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी-आॅल इंडिया पॅनथल सेना

भारतीय संविधानाचा अपमान केल्याबद्दल प्रवीण विठ्ठल तरडे यास तत्काळ अटक करून त्याच्या विरुद्ध देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी-आॅल इंडिया पॅनथल सेना

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

लिपीक वर्गीय कर्मचाऱ्यांसाठी लेखा विषयक प्रशिक्षणाचे आयोजन

लिपीक वर्गीय कर्मचाऱ्यांसाठी लेखा विषयक प्रशिक्षणाचे आयोजन

विविध योजनांच्या लाभार्थ्यांना हयातीचा दाखला जमा करण्याचे आवाहन

विविध योजनांच्या लाभार्थ्यांना हयातीचा दाखला जमा करण्याचे आवाहन

नाशिक रोड मध्यवर्ती कारागृहात ‘आंतरराष्ट्रीय योग दिन’ उत्साहात संपन्न; कैदी आणि अधिकारी वर्गाचा उत्स्फूर्त प्रतिसाद

नाशिक रोड मध्यवर्ती कारागृहात ‘आंतरराष्ट्रीय योग दिन’ उत्साहात संपन्न; कैदी आणि अधिकारी वर्गाचा उत्स्फूर्त प्रतिसाद

फाली शेतीचे ‘पॉवर हाऊस’ शेतकरी-उद्योजक प्रतिनिधीचा सुर; फाली-१२ वार्षिक अधिवेशनच्या अंतिम टप्प्याची सुरूवात

फाली शेतीचे ‘पॉवर हाऊस’ शेतकरी-उद्योजक प्रतिनिधीचा सुर; फाली-१२ वार्षिक अधिवेशनच्या अंतिम टप्प्याची सुरूवात

जैन हिल्स ला प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजनेचा विशेष कार्यक्रम;प्रोत्साहन अनुदान थेट लाभार्थ्यांना होईल हस्तांरण;पंतप्रधान नरेंद्र मोदींची असेल ऑनलाईन उपस्थिती

जैन हिल्स ला प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजनेचा विशेष कार्यक्रम;प्रोत्साहन अनुदान थेट लाभार्थ्यांना होईल हस्तांरण;पंतप्रधान नरेंद्र मोदींची असेल ऑनलाईन उपस्थिती

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo